महाराष्ट्राला केंद्राकडून २० लाख घरे मंजुरीवर श्रेय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मागील दशकात सरकारी योजनेतून मिळालेल्या अपूर्ण ४६ लाख घरांची कामे आधी पूर्ण करावी -किशोर तिवारी
महाराष्ट्राला केंद्राकडून २० लाख घरे मंजुरीवर श्रेय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मागील दशकात सरकारी योजनेतून मिळालेल्या अपूर्ण ४६ लाख घरांची कामे आधी पूर्ण करावी -किशोर तिवारी दिनांक -२७ डिसेंबर २०२४ https://maharashtrallosabha24.blogspot.com/2024/12/blog-post_26.html सर्व राष्ट्रीय व स्थानीय माध्यमांमध्ये केंद्र सरकारने राज्याला २० लाख पंतप्रधान आवास योजनेत नवी घरे मंजूर केली आहेत त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देण्यात आले आहे मात्र सरकारी घरकुल योजनेत प्रचंड व्याप्त भ्रष्टाचारामुळे ,तांत्रिक अडचणीमुळे ,सरकारी अनुदान अपुरे असल्यामुळे त्यातच शहरी भागात अडीच लाख रुपये तर ग्रामीण भागात फक्त एक लाख चाळीस हजार रुपये असे सनदी अधिकाऱ्यांच्या मनमानीने आदेश काढून पहिला हप्ता दिल्यानंतर दुसरा हप्ता वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवणारी नासलेली नोकरशाही यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात सुमारे ५० लाख सरकारी वनवास योजनेतील घरे अपूर्ण अवस्थेत आहेत यात जुन्या इंदिरा आवास योजनेच्या २० लाखांवर अपूर्ण घरांचे सापडे आपणास प्रत्येक गावात खेड्यात पोदार दिसतील यावर नवीन २० लाख घरांच्य...