महायुती सरकारची कापुस सोयाबीन भावांतर योजना हा देवेंद्र फडणवीस यांचा नवीन जुमला -शेतकरी नेते किशोर तिवारी
महायुती सरकारची कापुस सोयाबीन भावांतर योजना हा देवेंद्र फडणवीस यांचा नवीन जुमला -शेतकरी नेते किशोर तिवारी दिनांक -२३ एप्रिल २०२४ ज्या मोदी सरकारने मध्यप्रदेश राज्यातील भावांतर योजना म्हणजे हमी भाव व बाजार भाव यातील फरक देण्याची योजना जबरीने बंद पाडली ती भावांतर योजना मोदी सरकार आल्यास कशी काय सुरु ठेवणार त्यामुळेच महाराष्ट्रातील विदर्भ ,मराठवाडा ,खान्देश, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराट्रातील ३१ लोकसभा मतदार संघात पराभव दिसत असतांना चतुर चाण्यक्य देवेंद्र फडणवीस आचार संहिता सुरु असतांना घोषीत केलेली कापूस सोयाबीन भावांतर योजना हा एक जुमला असुन जो पर्यंत ३१ मतदार लोकसभा संघातील शेतकरी मोदी यांचा शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध ईव्हीएम द्वारे दाखविणार तोपर्यन्त केंद्राचे गुलाम राज्यात शेतकऱ्यांच्या वेदना समजत नाही असे स्पष्ट मत विदर्भाचे शेतकरी नेते किशोर तिवारी व्यक्त केले आहे . महाराष्ट्रातील विदर्भ ,मराठवाडा ,खान्देश, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराट्रातील काही लोकसभा मतदार संघ ज्या ठिकाणी ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कापुस सोयाबीन पिकांवर अवलंबून आहे त्या क्षेत्रात कापुस सोया